कधिच गरीब होणार नाही ही व्यक्ती:-
उद्योगे नाचती दारिद्र्य जपतो नास्ति पातकम् ।
मौने च कलहो नास्ति नास्ति जागरिते भयम्. ।।
भावार्थ मार्गदर्शिका,:-
जी व्यक्ती उद्योगधंदा करणारी आहे. काम करणारी आहे . त्यांच्याकडे दारिद्रयता ,निर्धन याही राहातं नाही.कारण जिथे हात राबतात ,त्या राबणा-या हातांना लक्ष्मीचे वरदान मिळते .त्या व्यक्तीस पैसाअडका, धनसंपत्ती प्राप्त होते.जी व्यक्ती सतत ईश्वराच्या नामाचे स्मरण करणे , अशा व्यक्तीचे पाप नाहीसे होते.त्याच्या पदरी पुण्याचा लाभ होतो.
दोन व्यक्तीमध्ये वादविवाद,कलह , भांडणतंटा , गैरसमज हे केव्हा निर्माण होतात , तर ते संवादाने .जर मौन राखले , कोणी कोणाशी बोललेच नाही तर मग वादाचा , कलहाचा,भांडणाचा प्रश्न हा येईलच कसा ? तसेच सर्व पातळीवर जर एखादी व्यक्ती जागरूक असेल , दक्ष असेल, सतर्क असेल तर अशा व्यक्तीस कशाचेही भय राहातं नाही .
टिप्पण्या